रारंगढांग
रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर पांढराशुभ्र हिमालय ताठ मानेने अनेक वर्ष उभा आहे. काश्मिरी भागात उंच खडे कडे आणि त्यांच्या एका बाजूला खोल दरीत फेसाळणारी सतलज इथल्या गोर्यागोमट्या माणसांचं आयुष्य खरंतर अगदीच सामान्य ; पण स्वैर अशा निसर्गामुळे असामान्य बनतं, अशा ठिकाणी रस्ते बांधायचे म्हणजे मोठ जोखमीचं काम आणि म्हणूनच तिथे सैन्याची शिस्त महत्त्वाची! छोट्यात छोटी गोष्टसुद्धा नियमात बसूनच व्हावी हा यांचा बाणा. त्यातच तिथे ले. विश्वनाथ मेहेंदळे येतो आणि कथा सुरू होते. अतिशय स्थिर, शांत, नव्या व उमद्या विचारांचा विश्वनाथ स्वतंत्रपणे काम करावे म्हणून पदोपदी आर्मीच्या शिस्तीला आव्हान देतो. त्याची नेमणूक रारंगढांगातून जाणाऱ्या रस्त्यावर होते. या बांधकामामध्ये असलेला धोका वरिष्ठयांच्या नजरेसमोर आणतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं. आणि मग जे व्हायचं तेच होते - अपघात ! आणि त्या अपघातामुळे सात जीव निष्प्राण होतात. तेव्हा त्यांच्या नावाचे सात आणि जास्तीचा खांब विश्वनाथ परस्पर बांधून टाकतो. हे बेकायदेशीर असूनही अने