पत्रास कारण की...!

पत्रास कारण की...!  

सध्याच्या माझ्या पिढीने अनेक नवीन गोष्टी तंत्रज्ञान फार जवळून पाहिलय अनुभवलय पण अनेक मजेशीर आणि सुंदर गोष्टी मात्र आमच्या पिढीने फक्त लुप्त होताना दुरूनच पाहिल्यात त्यातीलच एक सुंदर गोष्ट म्हणजे पत्र !
        तेच पत्र जे प्रियकर प्रेयसीच्या जगण्याचं एक महत्तवाचं साधन होतं, सैनिकांसाठी व त्यांच्या घरच्यांसाठी जगण्याचा आधार, आशा होतं, तेच पत्र अत्यांतिक आनंद देणारही असायचं आणि अनपेक्षीत दुःख देणारं सुद्धा ! पण अरविंद जगताप आणि चला हवा येऊ द्या च्या संपूर्ण अवलिया टिमने आमच्या पिढीला पत्रांच्या फार जवळ आणत त्यांचं महत्तव पटवून दिलं आणि आमच्या आधीच्या पिढीच्या जुन्या आठवणीमध्ये हरवून जायला भाग पाडलं ! याच पत्रांचा संग्रह म्हणजे पत्रास कारण की...!
        आता पत्र म्हणलं की ते भावनिकचं असेल असं मला पुस्तक वाचण्याआधी वाटायचं पण एक प्रचंड सामाजिक जाण असलेला लेखक तख्तालाही प्रश्न विचारण्याचं धाडस त्याच्या लेखणीतून कशा प्रकारे करु शकतो याची अनुभूती मला यातील अनेक पत्र वाचल्यानंतर आली. पुस्तकातील अनेक भावनिक पत्र नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या करतातच पण जेव्हा लेखक एखाद्या सामाजिक विषयावर पत्र लिहितात तेव्हा लेखकाच्या व्यक्तीमत्वाची जी झलक आपल्याला पाहायला ती झलक खरचं वाचण्या आणि वाखाणण्याजोगी आहे.
        पुस्तकातील सर्वच पत्र आपल्या मनाचा ठाव घेतात, आपल्याला फार जवळची वाटतात कारण ती आपलीच कहानी आपल्याला ऐकवतात. सोबतच आजुबाजूला घडणार्‍या गोष्टींविषयी आणि दैनंदिन आयुष्यात घडणार्‍या अनेक घटनांबाबत एक व्यापक दृष्टीकोन आपल्याला देऊन आपला वैचारिक वाढवतात जी मला या पुस्तकातील सर्व आवडलेली बाब आहे. पुस्तकातील लहान लहान वाक्यसुद्धा आपल्याला गहन विचार करायला भाग पाडतात जो करणे मला या काळातील सर्वात महत्तवाची गरज वाटते.
        बाकी पुस्तक वाचताना लेखकाच्या निरीक्षणाची तुम्ही अनेकवेळा प्रशंसा कराल याची मला मनापासून खात्री आहे.

प्रत्येकाने एकदा वाचा नक्कीच...!


-पार्थ भेंडेकर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

बाई, बायको, कॅलेंडर !

पहिले प्रेम